Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥1॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥ करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥2॥ तुका ह्मणे मोह परते चि ना मागें । ह्मणउनि त्यागें त्याग जाला ॥3॥
Tuka 948
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.